शिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी
वीर खेमा (रगतवान) नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंडथोपटते झाले.
शिवनेरी सकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. दख्खनपादाक्रांत
करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊनआला होता.
त्याने एका मुघल सरदारास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचेबंद मोडून
काढण्यास पाठविले. एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले नाहीत.कित्येक मारले
गेले आणि खेमा नाईकासमवेत दीड हजार बंदी बनविण्यात आले.मुघलांची दहशत
बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तमाम लोक पकडून आणूनकापले गेले.
नाईकास निर्वंश केले. आणि सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांचीशीरे कापली
गेली. त्या शिरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तोकोळी चौथरा
जो आजही शिवनेरीवर पाहायला मिळतो. इतिहासाच्या कुठल्याच नोंदीतत्या वीरांची
नावे उपलब्ध नाहीत. नाईकाचे खरे नाव, गाव आदी काहीच उपलब्धनाही. खेमा/खेमू
नाईक असा त्या नेत्याचा उल्लेख फक्त काही ठिकाणी आढळतो.
भलरत्रैमासिक हे आदिवासी समाजासाठी असून त्यात आपणास सुचणारे अपेक्षित बदल सुचविण्याचा अधिकार सर्वांना आहे. आपल्या सुचना किंवा प्रतिक्रिया bhalarmasik@gmail.com वर किंवा ९८९०१५१५१३ या नंबरवर Whats App करा.
0 comments:
Post a Comment